एका कुरुंदकराने दुसऱ्या कुरुंदकराला वाहिलेले अर्घ्य
कुरुंदकरांसारखी माणसे आकलनाच्या बाबतीत नेहमी आव्हानच ठरत असतात. सर्व बाजूंनी मनाजोगे रेखाटूनही शेवटी मन असंतुष्टच राहून जाते. कारण काही अंगे व पैलू आकलनाच्या चाळणीतून निसटूनच गेलेले असतात. तरीपण असे आव्हान स्वीकारणे हे एक साहस असते. ते पत्करल्याबद्दल व पेलण्याची आकांक्षा इतरांमध्येही उत्पन्न करण्याची प्रेरकता अक्षुण्ण ठेवल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.......